
उंड्री : पाऊस कमी झाल्यामुळे डिसेंबर-जानेवारीपर्यंत खळखळून वाहणारे ओढे-नाले सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच कोरडे पडले आहेत. ओढ्यावर बांधलेल्या बंधाऱ्यातही पाण्याची टिपूस नाही, त्यामुळे विहिरी आणि बोअरवेललाही एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणी कमी पडण्याची शक्यता येथील होळकरवाडीतील शेतकरी लक्ष्मण झांबरे यांनी व्यक्त केली.
मागिल काही वर्षांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे वर्षभर खळखळून वाहणारे ओढे आता डिसेंबर-जानेवारीमध्येच कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यातच विहिरी आणि बोअरवेलला पाणी कमी पडते. शेती निसर्गावर अवलंबून आहे. खरीपामध्ये बाजरी, भुईमूग, तर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू अशी पिके घेतली जातात. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बाजारी आणि भुईमूगालाही उतार कमी बसल आहे. त्यामुळे ज्वारी आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.
मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाई भासत असल्याचे होळकरवाडीतील शेतकरी अनंता झांबरे आणि नानासाहेब झांबरे, भैरू झांबरे, पांडुरंग होळकर, धोंडिबा झांबरे यांनी सांगितले.
नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी मागिल महिन्यापासून महापालिकेच्या माध्यमातून दररोज दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. दररोज दोन टँकर गावातील पाण्याच्या टाकीत सोडले जातात. तेथून गावातील नागरिकांना नळद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, असे माजी सरपंच प्रज्ञा झांबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.