कचरा टाकणारे नव्हे उचलणारे व्हा - सुमित्रा महाजन

आम्ही इंदुरकर रस्त्यावर कचरा टाकणारे नव्हेत, तर कचरा उचलणारे आहेत. यामुळेच इंदूर शहराने स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण केली.
Sumitra mahajan
Sumitra mahajanSakal
Summary

आम्ही इंदुरकर रस्त्यावर कचरा टाकणारे नव्हेत, तर कचरा उचलणारे आहेत. यामुळेच इंदूर शहराने स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण केली.

पुणे - आम्ही इंदुरकर रस्त्यावर कचरा टाकणारे नव्हेत, तर कचरा उचलणारे आहेत. यामुळेच इंदूर शहराने स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण केली असल्याचे स्पष्ट आपण पुरस्कार विजेत्या महिलांनीसुद्धा आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन सामाजिक काम केले पाहिजे, असा सल्ला लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सोमवारी (ता.३) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिला. यामुळे भारत हा लवकरच महासत्ता बनू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई येथील आत्मोन्नती व विश्‍वशांती साधक संस्था, बीड येथील आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठ (गुरुकुल) वारकरी शिक्षण संस्था आणि पुणे येथील विराट समितीच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय आदिशक्ती मुक्ताई स्मृतीगौरव पुरस्काराने सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्‍टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, कोहिनूर ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपान महाराज वाल्हेकर, उपाध्यक्ष मिनाक्षी मोहिते आदी उपस्थित होते.

संत या शब्दाची निर्मिती मुक्ताईने केली. त्यांच्याच नावाने हा पुरस्कार दिला जात असल्याने, या पुरस्कारांचे विशेष महत्त्व आहे, असे स्पष्ट करत प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी मुक्ताईचे महत्त्व विशद केले. मुक्ताईच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने आपण आतापर्यंत केलेल्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यापुढे आपापल्या क्षेत्रात समाजसुधारणेचे काम हाती घेतले, पाहिजे, असे मत प्रा. मोरे यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले.

या समारंभात नऊ महिलांना आदिशक्ती मुक्ताई स्मृतीगौरव तर, अन्य सहा जणांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वारकरी संस्थेचे अध्यक्ष सोपान महाराज वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. यंदा या पुरस्कारांचे ३१ वे वर्षे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीकृष्ण मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्कारार्थी महिला

- डॉ. सुचित्रा कराड-नागरे (अध्यात्म व वैद्यकीय क्षेत्र)

- डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटील (शिक्षण)

- प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे (राजकीय व सामाजिक)

- सारिका संजय भेगडे (सामाजिक)

- तृप्ती कोलते-पाटील (प्रशासकीय)

- डॉ. वंदना मुरकुटे (राजकीय, सामाजिक)

- आशा भालेकर (सामाजिक, आध्यात्मिक)

- छायावती देसले (सामाजिक)

- ॲड. श्रुती कुलकर्णी (कला व सांस्कृतिक)

समाजभूषण पुरस्कारार्थी

- अभिजित पाटील (सामाजिक, राजकीय)

- किरण गांधी (अध्यात्म, ज्योतिष)

- अशोक जाधव (कला व सांस्कृतिक)

- किशोर खेडकर (योग, आध्यात्मिक)

- प्रा. सत्यजित खांडगे (शिक्षण, सांस्कृतिक)

- नागेश मोरे (कृषी, प्रशासन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com