

Sarathi Scholarship
sakal
पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीसाठी ‘सकाळ’ने उठविलेल्या आवाजाची दखल राज्य विधिमंडळात घेण्यात आली आहे. ‘सारथी’च्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक संकटाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले.