पुणे : मुळशीकरांना पुन्हा भातशेतीची गोडी

लागवडीच्या क्षेत्रात ६६३ हेक्टरने वाढ; उसाच्या पिकात घट
भातशेती
भातशेतीsakal

पिरंगुट : कमी उत्पन्नामुळे ऊस लागवड क्षेत्रात घट, कोरोनामुळे शेतीचे उमगलेले महत्त्व आणि पावसाने दिलेली साथ, आदी कारणांमुळे मुळशी तालुक्यात भात पिकाच्या लागवड क्षेत्रात यावर्षी तब्बल ६६३ हेक्टरने वाढ झाली आहे.

तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुळशीत खरीप क्षेत्र सरासरी १२ हजार ४०० हेक्टर असून, त्यात भात, ऊस, कडधान्ये व अन्य पिकांची लागवड केली जाते. या वर्षी उसाऐवजी भात पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकट्या मुठा खोऱ्यातील खारावडे गावात यावर्षी सुमारे आठ ते नऊ एकर ऊस क्षेत्र कमी झालेले असून पाच ते सहा एकर क्षेत्रात भात लागवड वाढली आहे. खारावडे येथील शेतकरी अंकुश मारणे, शंकरराव मारणे, रामभाऊ साळेकर, रामभाऊ ढेबे, विठ्ठल मारणे, लक्ष्मण मारणे व अन्य शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र कमी करून भात लागवडीला पसंती दिली आहे. वातुंडे, कोळावडे, आंदगाव, माळेगाव व अन्य गावांतही हीच परिस्थिती आहे.

नागपूर : इंजिनिअर युवकाचा युवतीवर अत्याचार

याबाबत आंदगाव येथील शेतकरी अंकुश मारणे म्हणाले, ‘‘ऊस पिकाची वेळेत तोडणी न झाल्याने उत्पन्नात घट होऊ लागली आहे. पाऊस सुरू झाल्यावर ऊस तोडणी सुरू झाली; तर वाहतुकीची समस्या उभी राहते. उशिरा ऊस तोडल्यामुळे उत्पन्न तर घटतेच, पण त्यानंतर त्या जमिनीतील खोडवा पिकात गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे खोडवा पिकाला नेमके कोंब फुटायच्या काळातच पाणी साचल्याने वाढीवर मोठा परिणाम होतो. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असून पाण्याच्या निचऱ्याअभावी उत्पादनही कमी होते. त्यामुळे मी यावर्षीपासून उसाचे सर्व क्षेत्र काढून टाकले असून, त्या क्षेत्रात भात पीक घेतले आहे.’’

‘‘मुठा खोऱ्यात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ऊस पिकावर तुडतुडे, पांढरी माशी व अन्य कीड असते. ऊस पिकालगतच्या बांधावरच आंब्याची लागवड झालेली असते. त्यामुळे उसावरील कीड आंब्यावर येते आणि त्याचा फटका आंबा पिकाला बसतो. कृषी विभागाने त्यावर पर्याय शोधला पाहिजे,’’ असे शेतकरी अंकुश मारणे यांनी सांगितले.

भातशेतीची आकडेवारी...(हेक्टरमध्ये)

७८५० : सरासरी क्षेत्र

८२६५ : या वर्षीची लागवड

७६०२ : गेल्या वर्षीची लागवड

६६३ : तुलनेने वाढलेले क्षेत्र

ऊस पिकाला या भागात एकरी सरासरी केवळ पस्तीस टन उत्पादन सापडते. शिवाय जमीन अडकून पडते. तिची मशागत होणे थांबते. त्याउलट भात पीक घेतल्यास त्या जमिनीत लगेचच गहू, हरभरा, ज्वारी, वाटाणा अथवा कोथिंबीर आदी उत्पादन घेता येते. त्यामुळे दुबार पिकामुळे मशागतही चांगली झाल्याने मातीचा पोत टिकून राहतो. त्यामुळे ऊस पीक घ्यायचे बंद करून त्या जमिनीत भाताची लागवड केली आहे.

- प्रशांत मारणे, शेतकरी, खारावडे (ता. मुळशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com