पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यावर २०३० पर्यंत टोलवाढ होणार नसल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यांवरील रकमेत यंदा टोलवाढ झाली आहे. मात्र, पुणे - मुंबई द्रुतगती मार्ग हा ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित आहे. तेथील टोलवाढीचे सूत्र १ एप्रिल २००५ रोजीच निश्चित करण्यात आले आहे.
या रस्त्यावर अखेरची टोलवाढ १ एप्रिल २०२३ मध्ये झाली आहे. आता ३० एप्रिल २०३० पर्यंत या रस्त्यावर कोणतीही वाढ टोलवाढ होणार नाही, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.