पुणे - पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवास उद्यापासून (ता. २७) सुरुवात होत असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात..या भक्तीमय वातावरणात नागरिकांना स्वच्छता, सुरक्षा आणि गणपती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मूर्तीदान संकल्पना, निर्माल्य संकलनातून खतनिर्मिती, शाडूमातीचा पुनर्वापर या उपक्रमांवर यंदाही महापालिकेचा भर आहे. विसर्जन घाट, कृत्रिम हौद व लोखंडी टाक्यांची सोय अधिक प्रभावी करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांपासून महापालिका नागरिकांना मूर्तीदानासाठी प्रोत्साहन देत आहे. मागील वर्षी (२०२४-२५) पुणेकरांनी तब्बल १ लाख ७६ हजार ६७ मूर्तीदान करून महापालिकेला दिल्या होत्या. त्यानंतर यंदा या संकल्पनेला अधिक बळ देत २४१ ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारण्यात आले आहेत..या माध्यमातून नदीप्रदूषण टाळण्यास मदत होणार असून, पर्यावरणपूरकतेसाठी नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विसर्जनासाठी महापालिकेने पुरेशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाच घाटावर गर्दी न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे.गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदीत टाकले जाते. त्यामुळे प्रदूषण वाढते. मात्र मागील वर्षी महापालिकेने या निर्माल्याचे वेगळे संकलन करून तब्बल ७०६ टन निर्माल्याचे सेंद्रिय खत पाषाण तलाव परिसरात तयार केले होते. यंदाही याच पद्धतीने खतनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार असून, नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता दिलेल्या कंटेनरमध्ये जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..विसर्जनासाठी वाढवली सोयन्यायालयाने पाच फुटांपेक्षा कमी आकाराच्या गणेशमूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करण्याचे आदेश दिल्याने महापालिकेने यंदा विसर्जनासाठी लोखंडी टाक्यांची संख्याही वाढवली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८ बांधकाम केलेले विसर्जन हौद बांधले आहेत. २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या उपलब्ध केल्या आहेत. नदीकाठावर ३२८ निर्माल्य संकलन कंटेनर उपलब्ध करून दिले आहेत..शाडूमाती संकलन व पुनर्वापरगणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडूमाती ही मर्यादित नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शाडूमातीचा पुनर्वापर करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल उचलले आहे.यंदा ४६ शाडूमाती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी जमा झालेली माती व मूर्ती पुन्हा मूर्तीकारांना परत दिली जाणार आहे. विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाची जनजागृती केली जाईल..नागरिकांच्या सहभागाची गरजमहापालिकेने केलेल्या या तयारीमुळे उत्सवाच्या काळात प्रदूषणावर आळा घालता येईल. यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.