

The civic body has arranged shelters, mobile toilets and German hangars to ensure proper facilities for lakhs of pilgrims staying in Pune.
Sakal
पुणे : अतिवृष्टीमुळे आषाढी वारीनिमित्त आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना आता पुण्यातच थांबावे लागणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने १०१ शाळांच्या इमारती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारपासून शनिवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.