

Pune
esakal
पुणे: जिल्ह्यात शुक्रवार (ता. ५) तसेच शनिवारी (ता.६) वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हिरवं स्वप्न उद्ध्वस्त झाले.वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले. उभी पिके जमीनदोस्त झाली, तसेच बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.