

Pune Cancels Water Cuts for Warkaris Amid Alandi Floods
esakal
पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी परिसरातील परिस्थिती गंभीर बनली असून, वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यातच मुक्काम करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पुढील पाच दिवस शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.