

पुणे - अशुद्ध पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा मेंदू विषयक आजार होत असल्याचे समोर आल्याचे पुणेकरांची चिंता वाढली आहेत. मात्र, शहरात खासगी टँकरच्या रोज हजारो फेऱ्या होत असूनही टँकरचालक हे पाणी कुठून भरतात ? ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. त्यामुळे या अनियंत्रित कारभारामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.