

A joint committee involving the Centre, State Government and civic agencies has been proposed to prepare an action plan for long-term water security.
पुणे : पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना शहराची पाण्याची गरजही दरवर्षी वाढत आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून धरणाची क्षमता वाढवा. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत ठेवण्यात आला. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.