Agriculture Loss
sakal
पुणे - जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) झालेला मुसळधार पाऊस व गारपिटीने विविध पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. अधिक फटका बसलेल्या काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मंगळवारी (ता. ३१) महसूल तसेच कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली, तर भोर तालुक्यात जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले.