खडकवासला - खडकवासला धरण साखळीत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील वाढ ही किरकोळ झाली आहे. चार ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली होती, मात्र पाच ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे..या आठ दिवसात खडकवासला येथे ५ मिलीमीटर, पानशेत येथे १५ मिलीमीटर, वरसगाव येथे १० मिलीमीटर, तर टेमघर येथे ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. १ ऑगस्ट रोजी धरण साखळीत एकूण २५.५६ टीएमसी (८७.७०%) पाणीसाठा होता..आज अखेर हा पाणीसाठा २५.८३ टीएमसी (८८.६३%) इतका झाला असून, वाढ अत्यंत किरकोळ आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत आजपर्यंत विसर्ग १२.८४ टीएमसी पाणी सोडले आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालवा मार्गे ७५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांतून आज कोणताही विसर्ग नाही..धरणनिहाय पाणीपाणीसाठा व पर्जन्यमान (९ ऑगस्ट)खडकवासला : पाऊस – शून्य, पाणीसाठा – १.२० टीएमसी (६०.८६%),पानशेत : पाऊस – ३ मिलीमीटर, पाणीसाठा – ९.५३ टीएमसी (८९.५४%).वरसगाव : पाऊस – २ मिलीमीटर, पाणीसाठा – ११.५८ टीएमसी (९०.३५%).टेमघर : पाऊस – २ मिलीमीटर, पाणीसाठा – ३.४९ टीएमसी (९४.१७%).एकूण पाणीसाठा २५.८३ टीएमसी (८८.६३%) इतका झाला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.