
बारामती (पुणे) : महाविकासआघाडीमध्ये आम्ही कधीच मंत्रिपद मागितलेले नव्हते. मात्र, माध्यमातून तशा बातम्या पेरल्या गेल्या. शपथविधीला साधे निमंत्रणही दिले नाही याबाबत नाराज आहोत. मात्र, याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार असा नाही, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
बारामतीत सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करतो आहे, त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. भाजप सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवीत आहे, त्याचसोबत समाजात दुही निर्माण करण्याचेही काम त्यांच्याकडून होत आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांना विरोध करतो आहोत. महाविकास आघाडीचा आम्ही एक घटक आहोत. मात्र, असे असले तरी आम्ही कधीही त्यांच्याकडे मंत्रिपद किंवा सत्तेतील वाटा मागितला नाही, असा खुलासाही शेट्टी यांनी केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजिबात समाधानी नाही. सात-बारा कोरा करण्याची ग्वाही निवडणुकीदरम्यान दिली गेली. प्रत्यक्षात मात्र त्यांची ही घोषणा वस्तुस्थितीला धरून नाही. जी कर्जमाफी जाहीर झाली, त्यात जे आश्वासन दिले होते ते कोठेही दिसत नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
केवळ थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. अटी व निकष पाहता सात हजार कोटींवर ही कर्जमाफी जात नाही. दोन टप्प्यात कर्जमाफीची भूमिका सरकारने घेतली आहे, एक वेळ त्या बाबत चर्चा करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात सरसकट पीककर्ज माफ करायला हवे. पीकच हातातून गेल्यावर त्या पिकावर काढलेले कर्ज शेतकरी कोठून भरणार, ज्या पिकांच महापूर व पावसाने नुकसान झाले आहे, त्यांचे कर्जमाफ झाले तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,
- राजू शेट्टी, माजी खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.