कर्जमाफीसाठीचा पैसा आणणार कोठून?

ramdas athwale
ramdas athwale

पुणे - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे फक्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. पण, त्यासाठी लागणारा निधी कोठून आणणार, असा प्रश्‍न करीत ही घोषणा अन्यायकारक असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पुणे दौऱ्यावर आले असता रविवारी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी या वेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि शिवसेनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मतभेद आहेत. असे अनेक मुद्दे भविष्यात समोर येत राहतील. त्यामुळे समान विचारसरणी असलेल्या शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्ट केले आहे. तरीही, काँग्रेस व विरोधी पक्ष चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवत आहेत. मुस्लिमांना भडकविण्याचे काम सुरू आहे. अयोध्येच्या निर्णयावर दोन्ही धर्मांकडून शांतता राखण्यात आली होती. त्याप्रमाणे आत्ताही शांतता पाळली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com