ration card
sakal
पुणे - ‘मिशन सुधार अभियानां’तर्गत आता दहा निकषांवर शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या ‘ॲग्रिस्टॅक’बरोबरच अनेक गोष्टींचा आधार घेण्यात येणार असून, एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास आणि त्यांचे उत्पन्न प्राधान्य योजनेच्या निकषांपेक्षा जास्त असल्यास त्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात येणार आहे.