
पुणे : गेल्या सहा महिन्यांपासून अंत्योदय; तसेच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या ३ लाख ३३ हजार शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे शिल्लक राहणारे हे धान्य प्रतीक्षा यादीवरील शिधापत्रिकाधारकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.