
satbara
esakal
पुणे - सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या ‘कलम १५५’चा गैरवापर झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांत दिलेल्या ३७ हजार ९६८ आदेशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साडेचार हजारांहून अधिक प्रकरणे संशयास्पद आढळली आहेत. त्यांची फेरतपासणी होऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.