महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा तोकडी 

महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा तोकडी 

पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. 

या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणची पाहणी प्रजासत्ताक भारत पक्षातर्फे करण्यात आली. यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी मेटल डिटेक्‍टर यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचे आढळून आले तर, बसविलेल्या ठिकाणी या यंत्रणेचा वापर होत नसून ती बंद असल्याचे दिसले. शहरातील महत्त्वाची ठिकाणांवर अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे शहरांची सुरक्षा धोक्‍यात आलेली आहे. 

पाहणी केलेल्या ठिकाणांमध्ये मुंबईतील मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या इमारती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारती, विविध प्रशासकीय इमारती, ऐतिहासिक ठिकाणे, पुणे सत्र न्यायालची इमारत, पुणे रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे. यातील बहुतांश ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आलेली असली तरी तिचा व्यवस्थित वापर होत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com