

Impact of 'Sakal' News: Forest Department Fills Dry Waterholes in Ambegaon
Sakal
निरगुडसर: आंबेगाव तालुक्यातील रांजणी,वळती या दोन गावातील वनविभागाच्या हद्दीत असलेले जंगलातील तीन पाणवठे कोरडे पडल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होताच वनविभागाकडून तातडीने कोरड्या पडलेल्या तीनही पाणवठ्यात पाणी सोडले आहे,यामुळे पशू पक्षांची तहान भागणार आहे. वळती (ता.आंबेगाव) येथील वनपरिमंडळात असलेल्या रांजणी,वळती,भागडी या तीन गावांच्या वनविभागाच्या हद्दीत पाच पाणवठे वनविभागाकडून उभारण्यात आले आहे.