जगदीश मारुती यांना ‘संरक्षा’ पुरस्कार

जगदीश मारुती यांना ‘संरक्षा’ पुरस्कार

पुणे, ता. १५ ः मध्य रेल्वेतील पाचही विभागात ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला आहे अशा १४ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे विभागात जगदीश मारुती (गँगमन) यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ते भिलवडी स्थानकावर २६ मार्च रोजी कामावर असताना विनागार्ड धावणाऱ्या मालगाडीच्या ब्रेक व्हॅनमधून एक वेगळा आवाज येत होता. त्यांनी तत्काळ स्थानक व्यवस्थापक यांना कळविले. किर्लोस्करवाडी स्थानकावर मालगाडी थांबवण्यात आली आणि ब्रेक व्हॅनला रेल्वेपासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे अपघात टळला. मुंबई येथे आयोजित समारंभात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक आर. के. यादव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. पदक, प्रमाणपत्र व रोख दोन हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अतिरिक्त सरव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता आदी उपस्थित होते. मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्यास हा सन्मान दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com