water tanker
sakal
कात्रज - दक्षिण उपनगरात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. महापालिकेकडून सम आणि विषम तारखेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नळ कोरडेच आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.