सर्वांच्या कल्याणासाठी जातिव्यवस्था हवी - शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

पुण्यातील व्याख्यानमालेत शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांचे प्रतिपादन
shankaracharya vidya narasimha bharati
shankaracharya vidya narasimha bharatiSakal

पुणे : ‘‘जातिव्यवस्था सर्वांच्या कल्याणासाठी आहे. मात्र अनेकांनी स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने जातिव्यवस्थेचा वापर केला. त्यामुळे धर्मशास्त्र व समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेली जातिव्यवस्था वाईट ठरली.

मानवाच्या कल्याणासाठी जातिव्यवस्था टिकवणे आणि योग्य पद्धतीने त्याचे अनुकरण करणे समाज व देशहिताचे आहे,’’ असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी येथे केले.

सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डीएम फाउंडेशनतर्फे आयोजित सप्ताहाचे व व्याख्यानमालेचे उद्‌घाटन शंकराचार्य यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘जात असावी की नसावी’ व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी धर्मशास्त्र, जातिव्यवस्था, समाजातील अनिष्ट चालीरीती यावर परखड भाष्य केले.

या प्रसंगी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, पत्रकार दत्ता जाधव, फाउंडेशनचे विजय देशमुख महाराज यांनी विचार मांडले. फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे, पदाधिकारी नरहर शिदोरे, जयमाला अनारसे आदी उपस्थित होते.

शंकराचार्य म्हणाले, ‘‘समाज सुशिक्षित होतोय; मात्र सुसंस्कृतपणा विसरत चालला आहे. सनातन वैदिक संस्कृतीने मानवाच्या कल्याणासाठी जातिव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. धर्मशास्त्राचे पालन न केल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत.

जात घालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती अधिक प्रभावी होत जाते. जातिव्यवस्थेचे कवच असल्यानेच ब्रिटिशांना धर्म फोडता आला नाही. आरक्षण व्यवस्था सर्वांसाठी घातक आहे. समाजाची घडी चांगली राहण्यासाठी जातिव्यवस्था टिकवली पाहिजे.’’ दिलीप भिकुले यांनी सूत्रसंचालन केले. बालेघाटे यांनी आभार मानले.

शंकराचार्यांचा तीव्र निषेध : नितीन पवार

देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातिव्यवस्थेचे समर्थन केले आहे. ते करताना ब्राह्मण परमेश्वराच्या मुखापासून, क्षत्रिय बाहूपासून, वैश्य मांडीपासून आणि शूद्र पायांपासून निर्माण झालेल्या श्लोकाचा संदर्भ दिला. शोषणावर, विषमतेवर आणि उतरंडीवर आधारलेल्या जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

व्याख्यानमालेत संयोजकांनी वक्ता म्हणून मलाही आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी आधी सांगितलेला विषय बदलून ‘जात असावी की नसावी’ असा निषेधार्ह विषय सांगितल्यामुळे व्याख्यान सुरू होण्याआधीपासूनच व्याख्यानमालेत अनुपस्थित राहून असहमती व निषेध दर्शवला होता.

शंकराचार्यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. त्यांच्या भाषणाच्या मागे असलेल्या बॅनरवर त्यांच्यासमवेत माझाही फोटो आहे. संबंधित फाउंडेशनने बॅनरवर फोटो लावण्यासाठी माझी परवानगी घेतली नव्हती. तसेच व्हिडिओमध्ये विषमता आणि शोषणमूलक जातिव्यवस्थेचे समर्थन शंकराचार्य करत आहेत, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मी त्यांचा निषेध करत आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com