पुणे - राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्या काळात केंद्रांवरील वर्गखोल्या, प्रयोगशाळांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण जतन करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत..परीक्षा काळात केंद्र परिसर, वर्गखोल्यांमधील सीसीटीव्ही बंद असणे, चित्रीकरण जतन करून न ठेवणे अथवा उपलब्ध करून न देणे, असे प्रकार गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने केल्याचे मानले जाईल. केंद्रांवरील प्राचार्य, केंद्र संचालक, समन्वयक यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाने दिला आहे..राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होत आहे. परीक्षेच्या काळात पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा सर्व परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे बंधनकारक केले आहे.परीक्षा केंद्र परिसरातील, वर्गखोल्या, माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान संगणक प्रयोगशाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण जतन करून ठेवणे अनिवार्य असल्याच्या सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी विभागीय मंडळांच्या सचिवांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत..परीक्षा सुरू होण्यापूर्वी कक्षातील कॅमेऱ्यांचे किमान ३० मिनिटे आणि परीक्षा संपल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे. केंद्रावरील डीव्हीआर/एनव्हीआरमधील प्रत्येक पेपर दिवशीचे रेकॉर्डिंग स्वतंत्र पेनड्राइव्ह/संगणकावर जतन करून ठेवणे, फुटेज साईज अधिक असल्यास हार्डडिस्कमध्ये ते जतन करून ठेवावे, रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक किंवा तंत्रस्नेही शिक्षकाची मदत घ्यावी, असा आदेश डॉ. माळी यांनी दिला आहे..डीव्हीआर/एनव्हीआरमध्ये पुरेशी हार्डडिस्क क्षमता किमान एक टीबी किंवा आवश्यकतेनुसार अधिक असावी. केंद्रांवरील सर्व पेपरच्या दिवशीच्या मूळ चित्रीकरणात कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, हे चित्रीकरण पेनड्राइव्ह किंवा संगणकावर संग्रहित करावे आणि आवश्यकतेनुसार चित्रीकरण पुढील आदेश येईपर्यंत जतन करून ठेवावे. विभागीय मंडळ किंवा दक्षता समितीने मागणी केल्यास ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत..राज्य मंडळाने दिलेल्या सूचना- आवश्यकतेनुसार चित्रीकरणाचा बॅकअप ठेवणे बंधनकारक- दररोज पेपर सुरू होण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री केंद्र संचालकांनी करून घ्यावी- जिल्हा दक्षता समिती, वरिष्ठ कार्यालय, राज्य मंडळाने मागणी केल्यास परीक्षा केंद्रांनी चित्रीकरण उपलब्ध करून द्यावे.गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणे, गैरप्रकारास मदत करणे आणि उत्तेजन देणे, या कलम क्रमांक तीननुसार कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्र संचालक, केंद्र समन्वयक यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे.- दीपक माळी, राज्य सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.