manjusha nagpure
sakal
पुणे - पावसाळ्यामध्ये शहरात पाणी तुंबू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्याचा दावा केला जातो. पण नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यापार्श्वभूमीवर चार महिने आधीच आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरासह प्रत्येक प्रभागासाठी पथक तयार करा, हे नियोजन केवळ कागदावर न ठेवता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करा असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले.