
पुणे ः जानेवारीत प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होणार असे कळाले आहे. ऑनलाइन क्लासमुळे प्रॅक्टिकल बंद झाले, विषय पूर्ण समजत नाही आणि आता कंटाळाही आला आहे. सुरक्षेची काळजी घेऊन, नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत,'' असे "बीएससी.'च्या अंतिम वर्षात शिकणारी निकिता कदम सांगत होती. तर, विद्यापीठाने महाविद्यालयांना तयारीसाठी वेळ दिला पाहिजे असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर टप्पटप्प्याने शाळा, महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू केले आहे. पण अजून, वर्ग सुरू झालेले नाहीत. महाविद्यालये सुरू व्हावेत यासाठी गेल्या महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दोन दिवस प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेतली होती. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू होतील असे संकेत देण्यात आले.
त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत देखील यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्राचार्य डॉ. विश्वास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू करताना काय काळजी घ्यायला हवी?, त्यात कोणती आव्हाने आहेत?, त्यावर उपाय काय असतील? प्राध्यापक, विद्यार्थी यांचे म्हणणे काय? या सर्वांचा विचार करून ही समिती पुणे विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे. पण व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त अद्याप मंजूर न झाल्याने समितीच्या सदस्यांना अद्याप अधिकृत पत्रही मिळालेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापकांसोबत समिती सदस्यांची एकही बैठक अद्याप झालेली नाही. पुढील आठवड्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत इतिवृत्त मंजूर होतील. त्यानंतर या समितीचे कामकाज सुरू होऊन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शिफारशींसह अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त हुकणार असल्याची शक्यता आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किमान 10 दिवसांची पूर्वकल्पना आवश्यक- पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाला तरी त्याच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आम्हाला करायची आहे. त्यानुसार प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक ठरविणे, सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, स्वच्छता अशी कामे करण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गडबड केल्यास गोंधळ होऊ शकतो.
येत्या काळात महाविद्यालये काही प्रमाणात सुरू झाली पाहिजेत त्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे मिनीट्स मंजूर झाले की समितीचे नियुक्तीचे पत्र मिळेल. त्यानंतर लगेच जिल्हानिहाय प्राचार्यांशी चर्चा करून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अहवाल सुरू केला जाईल. त्यामध्ये काय काळजी घ्यावी याबाबत शिफारशी केल्या जातील.-प्राचार्य डॉ. विश्वास गायकवाड, सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.