पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

पुणे : एकीकडे कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने सुखरुप घरी पोहोचले. मात्र, दुसरीकडे पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची घराकडे जाण्याची वाट सरकारच्या निर्णयामुळे बंद झाली आहे. आम्ही 'कोरोना'ने मरण्याऐवजी उपासमारीने मरू, आम्ही गरीब शेतकऱ्यांची पोरं आहोत, म्हणून सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे क? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारने आमच्या भावनांशी खेळणे बंद करावे असेही हे विद्यार्थी म्हणत आहेत.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुण्यात हजारो विद्यार्थी अडकले आहेत. ३ मेनंतर आपल्याला घरी जाता येईल, अशी आशा विद्यार्थ्यांना होती. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने ऑनलाईन अर्ज व्हायरल करून २ हजार ३०० विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली होती. ही माहिती विभागीय आयुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली आहे.  मात्र, ता १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यातच राज्य सरकारने पुण्यातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे गेले तीन-चार दिवसांपासून आपल्याला गावाकडे जाता येईल, या विचाराने आनंदी असलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी पुन्हा एकदा निराशेच्या छायेत गेले आहेत. २५ मार्चपासून या विद्यार्थ्यांना भोजन देणाऱ्या संघटनांची क्षमता ही संपत आली. त्यामुळे विद्यार्थी, संघटनांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून गावाकडे जाऊ द्यावे, अशी मागणी करत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत, पैसे नसल्याने काहींना घरमालकांनी रूम सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता करायचे तरी काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 
दरम्यान शनिवारी राज्य सरकारने प्रवास करण्यावर बंदी कायम ठेवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी ट्विटरवरून सरकारला जाब विचारण्यास सुरूवात केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तुम्हाला दिल्ली, कोटा येथील श्रीमंत विद्यार्थी दिसत आहेत, पण पुण्यातील शेतकऱ्यांच्या पोरांचे हाल दिसत नाहीत, असे ट्विट एमपीएससी समन्वय समितीने केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खूप मानसिक त्रास होत आहे. कृपया काहीतरी करा आणि आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या. १४  दिवस क्वारंटाईन राहायला तयार आहोत आम्ही...पण आत्ता आम्हाला घरी जाऊ द्या, असे ट्विट ऋषिकेश जोशी याने केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आमचे पण खूप हाल आहेत. पैसे नाहीत बाहेरून जेवण घ्यायची हिंमत होत नाही. रूम भाडं द्यायचं टेन्शन आहे. आज नाही दिलं तरी २-३ महिन्यांनी द्यावं लागेल तेव्हा कुठून पैसे आणायचे? आम्हाला घरी जाऊ दिलं जात नाही. अशा परिस्थितीत गरीब मुलांनी जीव द्यायचा का? आमच्या प्रती शासनाचं काहीच कर्तव्य नाही का? असा संतप्त प्रश्न एका विद्यार्थिनीने केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच काही घरमालकांनी विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर काढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य  खचलेले आहे. सरकार विद्यार्थ्यांची जबाबदारीही घेत नाही आणि घरीही जावू देत नाही. पैसे संपले, अन्नधान्य, गॅस पण संपले आहेत. काही विद्यार्थी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या मानसिकतेमध्ये आले आहेत. कधीही ह्या विद्यार्थ्यांचा भडका उडू शकतो. याला उपासमार व आर्थिक अडचण  हे कारण आहे. यावर मुलांना गावाकडे पाठविण्यासाठी लवकर निर्णय झाला पाहिजे.

- महेश बडे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com