पुण्यात भाजीपाला पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी: वाचा सविस्तर...

vegetables1.jpg
vegetables1.jpg
Updated on

मार्केट यार्ड : शहरात आणि उपनगरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत आहे. परंतु सिल झालेल्या काही भागात भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांकडून सध्या भाजीपाला आणि फळांना मागणी कमी आहे. परंतु मागणी कमी असली तरी किरकोळ बाजारात भाजीपाला, फळांचे भाव चढेच आहेत. सर्व प्रकारचा भाजीपाला ४० ते १४० किलो आहे. भाजीपाल्याच्या भावात २०-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 बाजारात संत्री, मोसंबी, डाळिंब आणि सफरचंदासह काही फळांचा तुटवडा आहे. त्यामुळे फळांच्या २० टक्क्यांनी भाव वाढ झाली आहे. बाजारात फळांची मागणी कमी आहे. त्यामुळे व्यापारी गाड्या कमी प्रमाणात मागवत आहेत. तसेच गाडी मागवली तरी ती वेळेत पोहचत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 


कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार चालू आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागातील आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी शेतीमाल खरेदी करून त्याची विक्री सोसायट्यांच्या आवारात करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यातील वेल्हे, सासवड, मुळशी, चाकण, खेड, मंचरसह परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात भाजीपाला मुबलक उपलब्ध आहे तर काही भागात तुटवडा निर्माण होत आहे.

 शहरात हॉटेल व्यावसायिक आणि खानावळी चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जातो. परंतु सध्या ते बंद आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहक भाजीपाला, फळे खरेदी करत आहेत. परंतु अपेक्षेपेक्षा फळांची मागणी खूप कमी आहे. ज्या भागात कठोर निर्बंध आहेत, तेथे भाजीपाला विक्रीच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. तुलनेने भाजीपाल्याला उठाव नसल्याने माल शिल्लक राहत असल्याचे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

शहरातील जे परिसर सिल केले आहेत. त्या परिसरात भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु त्याची अंमलबजवणी होत नाही. अनेक ठिकाणी दोन तासांची वेळ असल्याने दुकानाबाहेर गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास विक्रीस परवानगी द्यावी.

 प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते.


 

अक्षय तृतीया आल्याने आंब्यांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात कोकणातून अवाक आहे. परंतु मागणी जास्त आणि आवक कमी आहे. त्यामुळे आंब्याच्या भावात साधारणतः २०-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच सध्या आंबा घरपोच दिला जात आहे. त्यामुळे त्याचाही खर्च वाढला आहे. मुंबई मार्केट सुरू झाल्याने तिकडे माल जास्त जात आहे.

अरविंद मोरे, व्यापारी.
 

उपबाजारात भाजीपाल्याच्या १२८ गाडयांची आवक

गुरुवारी मांजरी व उत्तमनगर उपबाजारात एकूण भाजीपाल्याच्या १२८ गाडयांची आवक झाली. यामधून ५०८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. तसेच भुसार बाजारात एकूण १४१ गाड्यांमधून २० हजार ९८० क्विंटल धान्याची आवक झाली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com