
पुणे : "अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक व छगन भुजबळ यांच्यावर केवळ ऐकीव माहितीवरुन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. मग वाल्मिक कराडविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल असतानाही ईडीने अद्याप कारवाई का केली नाही ? कराडसारख्या लोकांकडुन खंडणी गोळा केली जात असेल, तर महाराष्ट्रात कंपन्यांकडुन गुंतवणुक कशी येणार ? संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे, ' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करत राज्य सरकारला धारेवर धरले.