Coronavirus : संशयित रुग्णांनी विलगीकरणाला शिक्षा नाही तर सुरक्षा समजावी

Quarantine
Quarantine
Updated on

पुणे - कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर विलगीकरण (क्वॉरंटाइन)वॉर्डमध्ये ठेवले जाते. हे विलगीकरण शिक्षा नाही तर तुमची स्वतःची आणि समाजाची सुरक्षा त्यात आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे संशयित रुग्णांनी  विलगीकरणाला घाबरून आजार लपवू नये, तर उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विलगीकरण कक्षातून काही रुग्ण पळून गेल्याचे प्रकार पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात घडले आहेत. तसेच, विलगीकरणाच्या भीतीने काही संशयित रुग्ण घराबाहेर पडत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ ने वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला. 

क्वॉरंटाइन आणि आयसोलेशन यातील फरक 
क्वॉरंटाइन    

प्रत्यक्षात विषाणूंचा संसर्ग झालेला नाही. पण, संसर्गजन्य भागात जाऊन आलेले आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे चौदा दिवसांसाठी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. या दरम्यान त्यांना लक्षणे दिसली तर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधणे आवश्यक असते. अशा व्यक्तींची ओळख पटावी यासाठी शिक्केही मारण्यात येत होते.

आयसोलेशन 
विषाणूंच्या संसर्गाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाते. हे रुग्ण अत्यवस्थ नसतात. सर्दी, खोकला, दम लागणे अशी लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांना यात ठेवले जाते. या प्रकारच्या रुग्णाचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठवून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवले जाते.  तेथे सोशल डिस्टसिंग काटेकोरपणे पाळले जाते. 

आयसोलेश सुविधा
सरकारी आणि महापालिकेची रुग्णालये उपचारांसाठी कमी पडतात. अशी वेळी काही इमारती, शाळा, वसतीगृहे, मैदाने, हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले जातात. तेथे डॉक्टर असतात. रुग्णाच्या प्रकृतीची सातत्याने नोंदी ठेवतात. अत्यवस्थ रुग्णाला तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची सुविधा असते. 

होम आयसोलेशन
लक्षणे नसलेल्या मात्र, कोरोनाच्या संसर्गाचे निदान झालेल्या रुग्णांनाही आता होम आयसोलेशनला परवानगी देण्यात आली. अर्थात, त्यासाठी घरात या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे बंधनकारक आहे. या प्रत्येक रुग्णाला स्वतःच्या आरोग्याची माहिती ॲप, पोर्टल या मध्यमातून सरकारी यंत्रणांना रोजच्या रोज कळविता येईल, अशी व्यवस्था केली आहे.

आयसोलेशन आयसीयू
कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना आयसोलेशन अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले जाते. लवकर उपचारासाठी सुरवात केल्यास आयसोलेशन आयसीयूमधील रुग्णांचे प्रमाण निश्चित कमी होईल. त्यासाठी रुग्णांनी न घाबरता आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार करुन घेतले पाहिजेत. 

आयसोलेशन वॉर्ड 
फक्त कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणे दिसत असलेल्या आणि व्हेंटीलेटरची गरज लागत नाही, अशा रुग्णांना आता उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास प्रधान्य देण्यात येत आहे. येथे रुग्णाला आहारापासून ते मनोरंजनापर्यंतच्या सुविधा असतात. त्यांना मोबाईल फोनवरून इतरांशी संपर्क साधता येतो. त्यामुळे आयसोलेशन ही शिक्षा नाही.

रुग्णाच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी रुग्णांना वॉर्डमध्ये दाखल केले जाते. कुटुंबातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, मधुमेह, हृदयविकार आहे, अशा जोखमीच्या रुग्णांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले जाते. 

आयसोलेशन ही शिक्षा नाही. त्याबद्दल भीती बाळगू नका. क्वॉरंटाइन किंवा आयसोलेशनच्या सविधा घरातही काटेकोरपणे करता येतील. त्यासाठी घरात स्वतंत्र खोलीत इतरांपासून वेगळे रहावे. त्यामुळे तुम्ही आणि कुटुंबातील इतर सदस्यही सुरक्षित रहातील.
- डॉ. कपिल झिरपे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन सोसायटी आॅफ क्रिटीकेल केअर   

आपल्याला कारण नसताना दाखल करुन ठेवल्याची रुग्णांची भावना होते. पण, अशा रुग्णामुळे समाजातील इतरांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्याशिवाय घरी पाठविता येणार नाही, अशा प्रकारे रुग्णांचे समुपदेशन करण्याची वेळ आता आली आहे.
- डॉ. सुभाल दीक्षित, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन सोसायटी आॅफ क्रिटीकेल केअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com