मुळशी तालुक्यातील या 17 गावांची चिंता मिटली  

hadash
hadash

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी पुरवठा करणारे हाडशी क्र. १, हाडशी क्र. २ आणि वाळेण येथील बंधारे मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील सतरा गावांचे वर्षभरासाठी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या तीन बंधाऱ्यांतील पाणी वळकी नदीमध्ये सोडण्यात येते. हे आवर्तन 21 दिवसांनी सोडण्यात येते. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या विहिरींचीही पाणीपातळी वाढते. या विहिरींतील पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. सुरुवातीला निसर्ग वादळामुळे व त्यानंतर दोन- तीन वेळा पडलेल्या जोरदार वळवाच्या पावसाने बंधाऱ्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने बंधारे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. तसेच, पावसाअभावी रखडलेली भात लागवडीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com