Sat, May 28, 2022

आळेफाटा येथे कांद्याची उच्चांकी आवक
भारनियमनावर तोडगा काढावा ः मयुरसिंह पाटील
Published on : 14 April 2022, 11:34 am
बावडा, ता. १४ ः इंदापूर तालुक्यातील अनियमित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यावर शासनाने तोडगा काढावा अन्यथा शेतकरी विविध मार्गाने शासनाला जाब विचारतील, असा इशारा इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी दिला.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या महावितरण कंपनीकडून भारनियमनाचे संकेत आलेले आहेत. सध्या आठ तासांचे भारनियमन होणार असे ऊर्जामंत्री सांगत आहेत. हे राज्य सरकारचे अपयश आहे. दहा तास वीज नसेल तर छोटे व्यावसायीक कसे टिकणार, हा प्रश्नच आहे. उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये गंभीर बनत निघाला आहे. तसेच पाणी असूनही विजेअभावी शेतीला पाणी देता येणार नाही. त्यामुळे पिके वाया जाणार आहेत. त्यामुळे याप्रश्नी तातडीने उपाययोजना व्हायला हवी.
Web Title: Todays Latest District Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..