जमिनीचा बेकायदा ताबा घेण्याचा धानोरेत प्रयत्न
Sakal

जमिनीचा बेकायदा ताबा घेण्याचा धानोरेत प्रयत्न

चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या दुतर्फा होणारी बेकायदा अवजड वाहनांचे पार्किंग प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठीही जीवघेणे ठरत आहे.
Summary

चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या दुतर्फा होणारी बेकायदा अवजड वाहनांचे पार्किंग प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठीही जीवघेणे ठरत आहे.

आंबेठाण - चाकण औद्योगिक वसाहतीत (Chakan Industrial Colony) रस्त्याच्या दुतर्फा होणारी बेकायदा अवजड वाहनांचे पार्किंग (Vehicle Parking) प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठीही जीवघेणे (Dangerous) ठरत आहे. एमआयडीसीने रस्त्यांसह वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून न दिल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एरवी अनवधानाने नियमभंग झालेल्या वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखवून दंड ठोठावणारे पोलिस मात्र या ठिकाणच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत.

चाकण औद्योगिक वसाहत चार टप्प्यांत विस्तारली आहे. पाचव्या टप्प्याची संपादन प्रक्रिया सुरू आहे. या भागात अनेक विदेशी कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगांना सुविधा देखील पुरविल्या आहेत. परंतु या भागात सध्या होत असलेली बेकायदा पार्किंग आणि कचऱ्याची समस्या इतकी भयानक झाली आहे की एमआयडीसीने दिलेल्या सुविधा यात झाकून गेल्या आहेत.

जमिनीचा बेकायदा ताबा घेण्याचा धानोरेत प्रयत्न
पुणे : पथारी व्यावसायिकांचे १२ कोटी रुपयांचे शुल्क महापालिकेने केले माफ

अपघाताचा धोका वाढला

तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने असल्याने मधून जाण्यासाठी अवघा आठ फुटांचा रस्ता शिल्लक राहत आहे. या मार्गावर असलेली मोठी वर्दळ, येणारे भाविक आणि याच मार्गावर असणारे विद्यालय पाहता नागरिक, विद्यार्थी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.

प्रवाशांचा जीव मिठीत घेऊन प्रवास

दोन्ही बाजूने वाहने असल्याने जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.यातमुळे अपघातांची संख्या वाढत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. एमआयडीसी किंवा वाहतूक पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ अशी बेकायदा पार्किंग केली जाणारी वाहने हटवावी, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावली जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.भाविक आणि विद्यार्थी यांच्याबाबत धोकादायक परिस्थिती आहे.अशी वाहने संबंधित कंपनीने त्यांच्या आवारात घ्यावी किंवा शासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी.

- दत्तात्रेय लांडगे, अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, खेड तालुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com