केबल चोरीमुळे शेतकरी हैराण

केबल चोरीमुळे शेतकरी हैराण

आंबेठाण, ता. ३० : एकीकडे शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे विजेची बिलं थकली आहेत. त्यात वारंवार मोटारीच्या केबल चोरीला जात आहेत. त्यामुळे बोरदरा आणि गोनवडी (ता. खेड) भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. निसर्गाशी लढायचं की चोऱ्या रोखायच्या असा सवाल नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या भागात वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखाव्या आणि शेतकऱ्यांना नाहक होणारा आर्थिक भुर्दंड टाळावा अशी मागणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते पाटील यांनी केली आहे. भीमा नदीकाठच्या बोरदरा येथील जवळपास २० आणि गोनवडी येथील जवळपास ३० शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या मोटारींच्या केबलची चोरी झाली आहे. यात प्रत्येक शेतकऱ्याचे जवळपास २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच गोनवडी येथे असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेची मोटार देखील मागील तीन वर्षात दोनदा चोरीला गेल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com