मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा 
‘यशवंत ब्रिगेड’कडून इशारा

मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा ‘यशवंत ब्रिगेड’कडून इशारा

बारामती, ता. ५ : आरक्षण नसल्याने धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी ‘यशवंत ब्रिगेड’ संघटनेच्याच्या वतीने धनगर समाजाचा २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेशाच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लढा सुरु आहे. सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीचे (एसटी) आरक्षण दिले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, २८ फेब्रुवारीला बारामतीत धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
यशवंत ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष बापूराव सोलनकर, यशवंत छावा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब मारकड, गणपतराव देवकाते, आनंद कोकरे, डॉ. संदीप घुगरे, संपतराव टकले, वसंतराव शेळके, चंद्रकांत वाघमोडे, पोपटराव धवडे, शंकरराव ढेबे, मल्लिकार्जुन पुजारी, सौरभ हटकर, राज पाटील, वसंत घुले आदींच्या वतीने ही मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com