‘भामा आसखेड’मधून
यंदा पहिल्यांदाच विसर्ग

‘भामा आसखेड’मधून यंदा पहिल्यांदाच विसर्ग

Published on

आंबेठाण, ता. १९ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून चालू वर्षाच्या पावसाळी हंगामातील पहिला विसर्ग मंगळवारी (ता. १९) सोडण्यात आला. सध्या धरण ९६ टक्के भरले असून, धरणाच्या चारही दरवाजांतून ८०४० क्यूसेसने पाणी भामा नदीपत्रात सोडले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा आहे. विसर्ग सुरू करण्यासाठी धरणाचे चारही दरवाजे ७५ सेंटीमीटरने उचलण्यात आले आहेत.
धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून ७४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात शंभर टक्के पाणीसाठा जमा झाला होता. धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ९६ टक्के म्हणजे ७.५६ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा हा ७.०९ टीएमसी इतका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com