आळंदीचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

आळंदीचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

Published on

आळंदी, ता. १८ : भामा आसखेड धरणावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे गळती दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले. त्यामुळे आळंदी शनिवारी (ता. १७) रात्रीपासून पाणी गावठाणात सुरु करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुख शीतल जाधव यांनी सांगितले की, मागील काही दिवस शहराला पाणी पुरवता आले नाही. अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. पुणे महापालिकेशी संपर्कात राहून पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल, याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. पुणे महापालिकेकडून पूर्ण दाबाने पाणी आल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील आलेल्या तांत्रिक अडचणी दूर केल्या. शहरास शनिवारी रात्री नऊनंतर पाणी सोडण्यात आले. गावठाणानंतर पूर्ण रात्रभर पाणीपुरवठा करणारे जलकुंभ भरून वितरित केले. रविवारी (ता. १८) सकाळी साडेनऊपासुन एकूण तेरा टप्प्यात पाणीपुरवठा केला. आळंदी शहरात सकाळी टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागात एक तास पाणीपुरवठा याप्रमाणे तेरा टप्प्यात क्षेत्रनिहाय पाणी सोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.