आळंदीत शुक्रवारी कलशाची मिरवणूक, रथोत्सव
आळंदी, ता. १३ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त गुरुवारी (ता. १४) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत भाविकांच्या देणगीतून तयार केलेल्या २२ किलो वजनाच्या सुवर्णकलशाची मिरवणूक आळंदी शहरातून सवाद्य काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कळसाचे पूजन दुपारी दोन ते चार या वेळेत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत माउलींचा मुखवटा रथामध्ये ठेवून रथोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वे जन्मोत्सव वर्ष राज्यात साजरे करण्याचे परिपत्रक नुकतेच सरकारकडून काढण्यात आले. त्यानिमित्त बसविण्यात येणाऱ्या सुवर्णकलशाची गुरुवारी (ता. १४) ढोल ताशा, टाळ मृदंगाच्या गजरात आणि बँडच्या तालात सायंकाळी पाच ते आठ यावेळेत आळंदीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १५) माउलींची प्रतिमा किंवा मूर्ती पालखीत ठेवून त्याची मिरवणूक स्थानिक स्वराज्य संस्था तसेच गाव पातळीवर राज्यात काढण्यात यावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार आळंदीत ग्रामस्थ वारकरी आणि आळंदी देवस्थान यांच्या तर्फे माउलींचा मुखवटा रथामध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंदिरावर बसविण्यात येणारा सुवर्ण कळस तपस्वी वारकऱ्यांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे. माउलींच्या जन्मोत्सवानिमित्ताने सध्या समाधी मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून त्यात प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.