शेतकरी अपघात विमा योजनेत वाढ करा : पवार

शेतकरी अपघात विमा योजनेत वाढ करा : पवार

बेल्हे, ता. १ : शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या (गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना) रकमेत वाढ करून ती २ लाख रुपयांऐवजी त्यात १० लाख रुपयांपर्यंत करावी, अशी मागणी नुकतीच जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात २००५ - २००६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर राज्यामध्ये गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ता. ९ डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामध्ये शेती व्यवसाय करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, सर्पदंश, पूर, विजेचा शॉक लागणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात आदी कारणांमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना २ लाख सानुग्रह अनुदान देण्यात येते. परंतु सदर रक्कम फारच तुटपुंजी आहे. तरी या रकमेत वाढ करून त्यात १० लाख ( दहा लाख रुपये) पर्यंत वाढ करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com