मुळशीत भात पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात

मुळशीत भात पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात

Published on

भुकूम, ता. १० ः मुळशीत पावसाने आतापर्यंत चांगली साथ दिल्यामुळे भात पीक जोमात आहे. रोपे निसवली असून, लोंब्या बाहेर पडल्या आहेत. लोंब्या भरून रोपे अंतिम टप्प्यात असून, दिवाळीपर्यंत भात काढणी सुरू होईल.
तालुक्यात यावर्षी पाऊस मे महिन्यात सुरू झाल्यामुळे भात लागवड सर्व क्षेत्रात होऊ शकली नाही. दरम्यान, लागवड झालेल्या रोपांची स्थिती चांगली आहे. सततच्या पावसामुळे काही भागात करपा रोग पडू लागला आहे. तालुक्यात दोडकी, साळ या जातीची भात रोपे काढणीस आली आहेत. प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड तालुक्यात सर्वत्र केली जाते. यापूर्वी आंबेमोहोर जातीच्या भाताची लागवड सर्वत्र होत होती. दरम्यान, उंच रोपांमुळे अधिक नुकसान होत होते. म्हणून शेतकरी इंद्रायणी भात जातींचे लागवडीकडे वळले आहेत. शेवटच्या टप्प्यात निसर्गाने चांगली साथ दिल्यास यावर्षी भाताचे चांगले उत्पन्न मिळेल ,अशी शेतकऱ्यांना आहे.

02761

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com