शरद पवार यांनी महायुतीत 
यायला हवे होते : आठवले

शरद पवार यांनी महायुतीत यायला हवे होते : आठवले

Published on

खळद / बारामती, ता. २५ : ‘‘काँग्रेस पक्षाने काढून टाकल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेस बरोबर न जाता नरेंद्र मोदींना, विकासाला व देशाच्या प्रगतीला साथ द्यायला हवी होती. ते विकासाच्या दिशेने जाणारे नेते होते. त्यांनी महायुतीत यायला हवे होते,’’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुरंदर तालुक्यातील खळद येथे आयोजित केलेल्या सभेत आठवले यांनी मार्गदर्शन केले. तसेच, बारामतीत येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, ‘‘मी मंत्री बनू शकलो असतो, पण प्रणव मुखर्जी, अहमद पटेल व शरद पवार यांनी मला बोलावून मंत्री करता येणार नसल्याचे सांगितले होते. माझा पराभव झाल्यानंतर दिल्लीतील माझ्या बंगल्यातील सामान रस्त्यावर काढले गेले, अनेक जण सत्तेवर नसतानाही आजही दिल्लीत राहतात. माझ्या बाबतीत कॉंग्रेसने अन्याय केल्याची खंत आजही मला आहे. कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याची प्रतिज्ञा त्याच वेळी मी केली होती.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com