पवारसाहेबांनी मनाला का
लावून घेतले : चित्रा वाघ

पवारसाहेबांनी मनाला का लावून घेतले : चित्रा वाघ

बारामती, ता. २ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ म्हणताना कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे कोणी ते अंगावर घेण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे पवारसाहेबांनी मनाला का लावून घेतले,’’ असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
त्यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे या महागाई व बेरोजगारीबाबत टीका करत असल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सरकारमध्ये होते, काय केलं तुम्ही? कथनी व करणी यात फरक असतो. सत्तेत असता तेव्हा विसरून जाता, विरोधात असल्यावर त्यांना महागाई आठवते. कॉंग्रेसच्या काळात अकराव्या क्रमांकावर असलेला भारत आज पाचव्या क्रमांकावर नरेंद्र मोदींनी भारत आणला आहे.त्या काय बोलतात याला महत्त्व नाही, पण त्यांची परिस्थिती बघून हसायला येत आहे. काम केले आहे अजितदादांनी आणि अहवालात त्या त्यांचे काम म्हणून सांगतात.’’

‘संजय राऊत सर्वज्ञानी’
संजय राऊत यांनी याबाबत टीका केल्याचे सांगितल्यानंतर चित्रा म्हणाल्या, ‘‘तो तर सर्वज्ञानी आहे, त्याच काय ऐकता तुम्ही? कॉंग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतो, असे शंभरदा मी बोलली आहे. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यातील जामीनावर सुटलेला आरोपी आहे तो.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com