उजनी दुर्घटनेबाबत 
गुन्हाच दाखल नाही

उजनी दुर्घटनेबाबत गुन्हाच दाखल नाही

बारामती, ता. १ : उजनी धरणाच्या जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला, ही घटना घडून आता नऊ दिवस उलटूनही याबाबत गुन्हाच दाखल झाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
जलसंपदा विभागाचे अधिकारी व बोटमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्राहक पंचायतीचे ॲड. तुषार झेंडे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृतदेह आमच्या हद्दीत नसल्याचे इंदापूर पोलिसांचे म्हणणे होते, तर तपास सुरु असल्याचे करमाळा पोलिसांचे म्हणणे आहे. इतकी मोठी दुर्घटना घडूनही अजून गुन्हा दाखल न झाल्याने कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागितलेली असून, या प्रकरणी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे व मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाखांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com