कटफळ रेल्वे फाटक बंद न 
करण्याची ग्रामस्थांची मागणी

कटफळ रेल्वे फाटक बंद न करण्याची ग्रामस्थांची मागणी

Published on

बारामती, ता. १२ : येथील एमआयडीसी मधील विमानतळानजीक असलेले रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करू नये, अशी मागणी सावंतवाडी गोजुबावी, तांदूळवाडी, उंडवडी, कटफळ आदी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे रूळ ओलांडून कटफळ चौकाकडून विमानतळ, सावंतवाडी गोजुबावी, तांदूळवाडी, उंडवडी परिसरात जाता येते. दुसऱ्या बाजूने एमआयडीसीमधील विविध कंपन्यांसह कटफळ, वंजारवाडी परिसरात जाता येते. बारामती एमआयडीसीमधून संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्याने कटफळ रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
उड्डाणपूल वापरल्यास पाच किलोमीटर अंतर जास्त होते. यात इंधन व वेळेचा अपव्यय होत असल्याने हे फाटक बंद करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे. हे गेट फाटक बंद केल्याने व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com