वनमंत्री नाईकांच्या पुढे मांडल्या काळूसच्या शेतकऱ्यांनी समस्या

वनमंत्री नाईकांच्या पुढे मांडल्या काळूसच्या शेतकऱ्यांनी समस्या

Published on

चाकण, ता.१२: काळूस (ता.खेड) येथील शेतकऱ्यांनी मंत्रालय मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांची नुकतीच भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढपाळाच्या शेळ्या, मेंढ्याबिबट्या खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्या शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी वनमंत्री नाईक यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन तातडीने भरपाई द्या, असे आदेश दिले. अशी माहिती सुभाष पवळे यांनी दिली.
माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काळूस येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली. काळूस येथील शेतकरी विजय गायकवाड यांच्या तीन शेळ्या बिबट्याने नुकत्याच खाल्ल्याचे मंत्र्यांना सांगितले. शेतकऱ्याचे झालेली नुकसानभरपाई तातडीने मिळावी ही मागणी केली .या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री नाईक यांनी सकारात्मक उत्तरे देऊन मागण्या मान्य केल्या. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवळे, पदाधिकारी विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल अरगडे, संतोष खलाटे, भरत अरगडे, नवनाथ जाधव, सुरेश कौटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com