वाळद येथील महावितरणचा खांब अखेर हटविला

वाळद येथील महावितरणचा खांब अखेर हटविला

Published on

चास, ता. १ ः शिरूर-भिमाशंकर राज्य मार्गावर वाळद (ता. खेड) गावच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरण करताना महावितरणचा खांब अडथळा ठरत होता. याबाबत सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. याची दखल घेऊन महावितरणने तो खांब काढून वाहतूक सुरक्षित केली.

शिरूर-भिमाशंकर राज्य मार्ग लवकरच महामार्गात रूपांतरित होणार असून या मार्गावरील अरुंद असणाऱ्या पुलांचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वाळद, आव्हाट, डेहणे व टोकावडे येथील अरुंद असणाऱ्या पुलांची कामे जवळपास पूर्णत्वास गेले आहे. या पुलाला लागून असणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. वाळद येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणारे रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी रस्त्याच्या रुंदीकरणात विजेच्या खांब अडथळा ठरत होता. हा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाने काढायचा की महावितरणने यामध्ये तो अडकला होता. या बाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध महावितरणने याची दखल घेत हा खांब दुसरीकडे हलवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.