अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
चास, ता. ३१ ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चिखलगाव, कळमोडी तसेच अन्य भागामध्ये झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आणले आहे. कापणीयोग्य झालेले हळव्या भाताचे पीक जमीनदोस्त झाले असून, कापलेल्या पिकाचीही वाताहात झाली आहे.
चालू वर्षी खरीप हंगामाच्या पिकासाठी अतिशय उपयुक्त असा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके जोमदार होती. त्यामुळे शेतकरी चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगून होता. मात्र, या आशेवर पावसाने निराशेची झालर टाकली आहे. बुधवारी (ता. २९) व गुरुवारी (ता. ३०)झालेल्या मुसळधार पावसाने पिकांची वाताहात झाली. कापणीयोग्य झालेली हळव्या भाताची पिके जमीनदोस्त झाली असून, शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने हे पीक उद्ध्वस्तच होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कापून ठेवलेले पीक पावसात भिजल्याने खराब झाले असून, बांधून ठेवलेल्या पिकात पाणी गेल्याने भाताच्या ओंब्यांना मोड येण्याची भीती आहे. 
या बाबत बोलताना चिखलगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गोपाळे, पांडुरंग मुके म्हणाले की, ‘‘चालू वर्षी भाताची पिके जोमदार होती व त्यापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आम्ही बाळगून होतो. मात्र, गेली दोन दिवसांत झालेल्या पावसाने कापणीयोग्य झालेले भाताचे पीक भुईसपाट झाले असून, त्यापासून उत्पन्न मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे.’’ 
03992
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

