सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे : कवाडे

सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे : कवाडे

Published on

दौंड, ता. २७ : ‍‘‘सध्याच्या काळात लाँग मार्च काढण्याची वेळ आली तर तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या मागणीसाठी काढावा लागेल. पावसामुळे बसलेल्या फटक्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे,’’ अशी मागणी लाँग मार्च आंदोलनाचे प्रणेते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

दौंड शहरात रविवारी (ता. २६) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कवाडे यांनी कर्जमाफीची मागणी केली. ते कवाडे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने त्यांना प्रतिहेक्टर पन्नास हजार रुपये सानुग्रह मदत मिळावी, ही आमच्या पक्षाची मागणी आहे. जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे. शिक्षण हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. देशात सर्वांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व आरोग्य सेवा विनामूल्य दिल्या पाहिजेत. सर्वांना सहजपणे शिक्षण घेता यावे, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्यासह युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित सोनवणे व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
फलटण (जि. सातारा) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॅाक्टर आत्महत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, शक्य असेल तर विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास झाला पाहिजे. राजकारण न करता ज्या लोकांनी डॅाक्टर तरुणीला सतावले, अत्याचार केला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशाच्या विकासात काय योगदान आहे, याबाबत मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com