दुहेरी संकटामुळे उत्पादक शेतकऱ्यांत निराशा

दुहेरी संकटामुळे उत्पादक शेतकऱ्यांत निराशा

Published on

देऊळगाव राजे, ता.१७ : बदलत्या हवामानामुळे वखारीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच बाजारभावात घट झाली आहे. या दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. सध्याच्या बाजाराभावामुळे शेतकऱ्यांचा होणारा खर्चही वसूल होत नाही. यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांत निराशा पसरली आहे. यामुळे क्विंटलला किमान तीन हजार रुपये बाजारभाव देण्याची मागणी जोर धरत आहे.
चालूवर्षी राज्यात गरवी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मे महिन्यामध्येही शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरू होती. अचानक झालेल्या विक्रमी अवकाळी पावसामध्येही कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. चालूवर्षी सातत्याने हवामानात बदल होत आहे. मेमध्ये वाढलेले तापमान व बदलत्या हवामान, पडलेला पाऊस यामुळे अनेक कांद्याच्या वखारी खराब झाल्या आहेत. यामुळे शेतकरी कांद्याचे बाजारभाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहे. परंतु केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवूनही भावात अद्याप समाधानकारक वाढ झालेली नाही. सध्या चांगल्या कांद्याला प्रतिकिलोस १० ते २० रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे.
एकीकडे दिवसेंदिवस बाजारभावात घसरण होत असून, वखारीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीला आलेला दिसत आहे.

कर्ज फेडीचे आव्हान
मागील वर्षी मिळालेला चांगल्या बाजाराभावामुळे शेतकऱ्यांनी भरमसाट खर्च करून कांद्याचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी बँकाचे, पतसंस्थांचे व खासगी सावकाराचे कर्ज काढून कांदाचाळी उभारलेल्या आहेत. परंतु सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे. कर्ज फेडीचे आव्हान उभे राहिले आहे.


सोलापूर बाजार समितीत तीन दिवसात मिळालेला
तारीख आवक ( ट्रक) सा. मि.बाजारभाव
१२/७/२०२५ १०० १३ ते २१
१४/७/२०२५ १०५ १२ ते २०
१५/७/२०२५ १०० ११ ते २०

उन्हाळ्यात वाढलेले तापमान व झालेल्या पावसामुळे चालूवर्षी कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे खर्चही वसुल होत नाही. यामुळे केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना राबवावी.
- रणजित शितोळे, कांदा उत्पादक शेतकरी,

कांद्याला उठाव नसल्याने सध्या कमी बाजारभाव मिळत आहे.बाहेर देशात कांद्याला मागणी नसल्याने बाजारात वाढ होत नाही. बाहेर देशात कांदा गेल्यास कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याचा अदांज आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे.
- हिराशेठ पठाण, कांदा व्यापारी,सिध्देश्वर बाजार समिती सोलापूर


00602

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com