

देऊळगाव राजे, ता. २ ः शिरापूर (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उजनी धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यावर जलपर्णीची झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांकडून सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता सांडपाणी ओढ्यात सोडून दिले जाते. ते पाणी नदीला येऊन मिळाल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जलपर्णी वाढत आहे.
नदीतील जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पाण्यातून खाली जात नाही. त्यामुळे विषारी घटकांमध्ये वाढ होऊन पाणी आणखी दूषित होत आहे. शहरातील दैनंदिन सांडपाणी, कंपन्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण वेगाने वाढत आहे. सध्या उजनीच्या पाण्याचा शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. उजनीच्या पाण्यातील शेतीला पूरक असलेले जिवाणू नष्ट होत आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भीमा नदीतील जलपर्णीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीला सुद्धा याच पाण्याचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांना देखील त्या दूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने यावर प्रक्रिया करून किंवा औषध फवारणी केली पाहिजे.
- सुनंदा फाळके, सरपंच, शिरापूर
00719
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.